|
स्व. तात्यासाहेब केतकर हे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या अनन्य भक्तांपैकी एक ! श्री
महाराजांनी देह सोडल्यावर अनेक वर्षांनी ते तात्यासाहेबांच्या मुखातून बोलू लागले .
मुंबईतल्या मालाड उपनगरात ते रहात असत. आपल्या घरात असणार्या एका लाकडी पेटीवर ते
बसत आणि मग त्यांच्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा श्री महाराजांचा असे .
श्रद्धाशील माणसं नामस्मरणाविषयी विचारविनिमय करायला त्यांच्याकडे आवर्जून त्यांच्याकडे
जात असत.
मंडळी त्यांना भेटायला गेली . त्यांची तक्रार नेहेमीचीच होती .
महाराज ! नामस्मरण करताना चित्त एकाग्र होत नाही याला काय करावे ?
केतकरमहाराज किंचित हसून म्हणाले " एकाग्रता वगैरे फार पुढच्या गोष्टी आहेत ! मला सांगा
, तुम्ही मंडळी करता काय?
आम्ही डिफेन्स अकाउंटमधे नोकरीला आहोत.
" वा वा छान ! मग महिन्याचे तीस दिवस अगदी डटून काम करत असाल !"
नाही नाही ! रविवारच्या चार सुट्ट्या असतात ना ! मंडळी थोडी संकोचून म्हणाली !
ठिक आहे ! मग निदान पंचवीस दिवस तरी पूर्ण काम होत असेल .
"" नाही हो महाराज ! कसल्याकसल्या सुट्ट्या असतात . वीस बावीस दिवस काम होत असेल जेमतेम
! त्यांच्यापैकी एक थोडेसे लाजूनच म्हणाले .
जाउंद्या ! गेला बाजार बावीस दिवस तरी तुम्ही अगदी आठ तास राबत असणार ! हो ना?
नाही महाराज ! रोज आठ तास काम नाही होत !
का?
चहापाणी .. गप्पाटप्पा .. मधूनच कोणतरी काहीतरी विकायला येतं . पुन्हा जेवायची सुट्टी
!जेमतेम चारपाच तास काम होत असेल !
सगळे चांगलेच गोंधळले होते . महाराजांचा रोखच कुणाच्या लक्षात येत नव्हता !
बघा ! म्हणजे इतकं कमी काम करता . महाराज मिश्किलपणे हासून म्हणाले . " आणि पगार मात्र
अगदी पूर्ण ! महिन्याच्या महिन्याला अगदी स्टँप लावून घेता . खरं कि नाही?
होय महाराज ! आलेली मंडळी लाजेनं अगदी चकणाचूर होउन गेली होती !
" अरे नामस्मरणाचंही अगदी तसंच आहे . ते नुसतं करा , बसून करा झोपून करा कसंही करा
पण करा ! तुम्हाला महिन्याचा पूर्ण पगार मिळाल्यावाचून रहाणार नाही . महाराजांनी प्रेमानं
सांगितलं !
|